Posts

Showing posts from August, 2022

माऊंट एव्हरेस्ट : बस नामही काफी है!(?)

एकेक राज्य जिंकून घेत आठराव्या शतकाच्या शेवटी इंग्रजांनी आपले पाय हिंदुस्थानात घट्ट रोवले होते. सैन्य, लढाया,नकाशे, पुढच्यायुद्धयोजना सतत सुरूच होत्या. मात्र एक अडचण होती. लढाईसाठी आवश्यक असणार् ‍ या tactical नकाशांमध्ये भारतातल्या प्रांतांची नेमकी भौगोलिक माहिती देणं खूप कठीण होतं. कारण जागांची अंतरं, पर्वतांची ऊंची, त्यांचे अक्षांश, रेखांश...अशा प्रकारची अचूक माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे नकाशे आणि वस्तुस्थितीत तफावत येत असे. म्हणून यावर काम करण्याचं ब्रिटिश अधिकार् ‍ यांनी ठरवलं, विशेषतः टिपू सुलतानाशी झालेल्या लढाईनंतर. त्रिकोणमितीय किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून भारताचं सर्वेक्षण करण्यासाठी लेफ्टनंट कर्नल विल्यम लॅम्टन(William Lambton) याच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनीनं १० एप्रिल १८०२ रोजी एक प्रकल्प सुरू केला. जो नंतर Great Trigonometry Survey of India या नावानं प्रसिद्ध झाला. मद्रासपासून सुरू झालेलं हे काम वाढत हळूहळू उत्तर भारतातही सुरू झालं. पुढे १८३० साली सर जॉर्ज एव्हरेस्ट (Sir George Everest) हा भारताचा Surveyor General अर्थात मुख्य सर्वेक्षक अधिकारी म्हणून नियुक्त...

चाणक्य : नाटक नव्हे ध्यास...!

“राष्ट्र और समाज के उन्नती के पथ में यदि धर्म बाधक है, वह धर्मभी त्याज्य है!” अशा अनेक मर्मभेदी वाक्यांनी मनाचा ठाव घेणारं...श्री मिहिर भूता यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शक पद्मश्री मनोज जोशी यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्राण फुंकलेलं धगधगतं नाटक - “चाणक्य!” अस्खलित हिंदीभाषेच्या अमृतानं कानांना तृप्त करणारं हे नाटक बघणं म्हणजे मोठीच पर्वणी! संध्यावंदन करणार् ‍ या चाणक्यापासून सुरू होणारं हे नाटक पुढे ज्या पद्धतीनं आपल्यात भिनत जातं...ही सांगायची नव्हे तर केवळ अनुभवायची गोष्ट आहे! चार वर्षं संशोधन करून लिहिल्या गेलेलं हे नाटक तीन दशकांहून अधिक काळ रंगभूमीवर सादर होत आहे. चंद्रगुप्त मौर्य, राक्षस अमात्य या मुख्य भूमिका वठवणारे तसंच इतर सर्व कलाकार अत्यंत ताकदीचे आहेत! अप्रतिम अशी प्रकाश योजना व्यक्तिरेखांना वेगळाच उठाव देऊन जाते! त्यामुळं फार भव्य नेपथ्य वा इतर कुठल्या विशेष तंत्रज्ञांनाशिवायही तो काळ अत्यंत सहजपणे आपल्यासमोर अवतरतो! आलेक्झांडरची आक्रमणं, त्याकाळची शस्त्रास्त्रं असू देत वा वेशभूषा...सगळंच तोडीस तोड! आर्य चाणक्याच्या अचाट बुद्धिसामर्थ्याला शोभणारं तरीही कुठेही डोईजड...

होय....ही तीच बंडखोर भारतीय सैनिकांची २६वी तुकडी!

  मियाँ मीर...ही एका प्रसिद्ध सूफी संतावरून नाव असलेली ब्रिटिशांची मोठी छावणी होती. लाहोरपासून साधारण ५-६ किमी अंतरावर असलेल्या या छावणीत भारतीय सैनिकांच्या (Native Infantry) अनेक तुकड्या तैनात होत्या. यातलीच एक बंगाल आर्मीचा भाग असलेली २६ वी भारतीय तुकडी! ही बंगाल आर्मी १७५७ मध्ये उभी करण्यांत आली. यात आजच्या बंगाल, बिहार,उत्तर प्रदेश या भागांतले उत्तम असे भारतीय निवडण्यात आले. १८५७ पर्यंत प्रत्येकी ८०० सैनिक अशा बंगाल आर्मीच्या ७४ तुकड्या भारतभर तैनात होत्या! १० में रोजी मेरठमध्ये झालेल्या विद्रोहाची बातमी लाहोरला पोचली. “सगळ्या भारतीय सैनिकांकडून त्वरित शस्त्र काढून घेण्यात यावे(disarmament)...” या आज्ञेचं तंतोतंत पालन करत २६ वी भारतीय तुकडी सुद्धा १३ में रोजी नि:शस्त्र करण्यात आली. विद्रोहाच्या बातम्या ऐकून सैन्य बिथरू नये म्हणून त्यांच्यापर्यंत कमीत कमी बातम्या पोचतील अशीही दक्षता घेण्यात आली. कारण रावळपिंडी,होशियारपूर,जलंदर ..कितीतरी छावण्यांमध्ये भरपूर भारतीय सैन्य तैनात होतं! यावेळी पंजाबचा चीफ कमिश्ंनर सर जॉन लॉरेन्स यानं बंगाल आर्मीमधल्या हिंदुस्तानी सैन्याला धमकाव...

१० में आणि १८५७ चं स्वातंत्र्य समर!

२९ एप्रिल रोजी Times मधे एक बातमी वाचली - अमृतसर जिल्ह्याच्या अजनाला शहरात एका विहिरीत जे शेकडो सांगाडे सापडले ते १८५७ च्या स्वातंत्र्य समरातले आहेत! Frontiers in Genetics या जर्नलमधे याबद्दल सविस्तर लेख आहे. त्यावेळी २६ वी नेटिव (भारतीय) बंगाल इनफंट्री बटालियन त्या भागात तैनात होती!पुराव्यांवरून हेही सिद्ध झालं की यात प्रामुख्यानं बंगाल, ओडिशा, बिहार आणि उत्तर प्रदेशातले भारतीय सैनिक होते. फ्रेड्रिक हेनरी कूपर या तत्कालीन कमिश्ंनरच्या आज्ञेनुसार कोणतीही संधी न देता,कोणताही कायदा न पाळता २४२ सैनिकांची सामूहिक कत्तल करून त्यांना अजनालमधल्या पोलिसठाण्याजवळच्या कोरड्या विहिरीत टाकून देण्यात आलं होतं. वर कोळसा आणि इतर कचरा टाकून ती विहिर बुजवण्याचा प्रयत्नही केला. मार्च २०१४ मधे गुरुद्वाराच्या प्रमुखांनी उत्खननात हे सांगाडे मिळाल्याचं कळवलं. या विहिरीला पंजाबी भाषेत “शहीदन दा खु” किंवा “कलियनवाला खु” (काळी विहिर)असं म्हणतात. २०१४ पासून त्या सांगाड्यांवर प्रयोग आणि संशोधन सुरू होतं. आता त्याची खात्री पटली आहे! कुणी फ्रेड्रिक अशा प्रकारे सैनिक मारून विहिरीत ढकलतो,कुणी विल्यम हडसन दिल्लीत अं...

भूर्जपत्रं...कश्मीरच्या भूमितले - आठवणीतलं झाड!

  हिमालयाच्या कुशीतल्या आठवणी म्हणजे सुखद गारवाच! ही अशीच एका वृक्षाची आठवण!कश्मीरचा अत्यंत दुर्गम भाग...तिथे आमच्या युनिटनं रस्तेबांधणीचा ध्यास घेतला होता. या छोट्या रस्त्यांनी अनेक फायदे होतात. मुख्यत: अति-दुर्गम भागात गाडी जाऊ शकते आणि तिथे पहारे देणार् ‍ या infantry च्या जवानांना वेळेत रॅशन मिळतं! यासाठी मुळात आतल्या भागात असलेल्या त्यांच्या छावण्या आणि मुख्य रस्त्यांपासून तिथपर्यंत रस्ता (किंवा track)कसा बांधला जाऊ शकतो यासाठी पाहणी करणं आमच्यासाठी महत्त्वाचं असे. अंगावर जाडजाड कपड्यांची आवरणं सांभाळात दर् ‍ याखोर् ‍ यांमधे मैलोन् मैल पायपीट व्हायची. मात्र बांधून झाल्यानंतर त्या नवीन रस्त्यांवर पहिल्यांदा जिप्सी किंवा जीपमधे बसून गोल गोल वळणांनी वर टोकावर पोचणं हा अक्षरशः रोमांचकारी अनुभव असे! (ट्रायल असल्यानं धाकधूकही असायची!!!!). एकदा एका भागाचं निरीक्षण करत फिरतांना आमची आहे ती गाडी बंद पडली. मग driver आणि काहींना तिथे मागे सोडून माझे वरिष्ठ अधिकारी (मेजर साहेब),रिटायरमेंटला आलेले एक अनुभवी हवालदार, एक जवान आणि मी (नुकतंच प्रमोशन झालेली एक उत्साही कॅप्टन साहिबा), असे पुढ...

International Womens day celebration Going global

I was fortunate to be one of the speakers on the panel for a discussion on the occasion of International Women's Day 2022 - global celebration held in Dubai. Interacted with some great personalities like Jessica Smith (Paralympion and international speaker) and all other dignitaries on various issues. The discussion mainly covered diversity and inclusion, upcoming challenges and opportunities, other key barriers as well as reforms at organizational level in global scenario to #BreakTheBias With initial talk of sharing the journey of women officers in Indian Army so far and their recent advancement, I shared my own positive experience in the organization. It is the peculiarity of Army training to break the internal barriers in our mind and get ready to lead at different levels. It embeds gender equality in unique way, utmost priority being #NationFirst ! Army shapes up in such a way that we face further challenges with extreme positivity, may it be undergoing rigorous physica...

रामकथामाला - संपूर्ण भारताला सांधणारं ऐक्याचं सूत्र आणि अखिल मानवजातीसाठी दीपस्तंभ! - पुस्तक परिचय.

“आमची स्वधर्माची कल्पना ही स्वराज्याशिवाय भिन्न नाही, ती दोन्ही साध्य- साधन या नात्याने संलग्न आहेत. स्वधर्माशिवाय स्वराज्य तुच्छ होय व स्वराज्याशिवाय स्वधर्म बलहीन होय.” सावरकरांच्या या उक्तीप्रमाणे या तत्त्वद्वयांसाठी - स्वधर्म आणि स्वराज्यासाठी जगणारे आणि लढणारे पराक्रमी वीर ही भारताची ओळख! याचा परमोच्च आदर्श म्हणजे प्रभू श्रीराम! दुष्टांचं निर्दालन करून धर्मसंस्थापना अर्थात न्यायाचं राज्य पुन:स्थापित करण्यासाठी रामाने जन्म घेतला!अत्युच्च कोटीची राष्ट्रनिष्ठा, पराक्रम, धर्मपरायणता श्रीरामाच्या चरित्रातून स्त्रवते. म्हणूनच रामायण म्हणजे केवळ रामाची जीवनकथा नसून शतकानुशतकं भारतीय जनमानसाला व्यापून टाकणारा, समाजाला सामर्थ्यशाली करणारा तो जीवनमंत्र आहे! रामकथेला अतिशय व्यापक स्वरुपात किंबहुना वैश्विक स्वरुपात मांडणारं एक अभ्यासपूर्ण पुस्तक नुकतंच वाचनात आलं- दीपाली नरेंद्र पाटवदकर यांचं “रामकथामाला”! रामायणावरचे व्यासंगी संशोधक डॉ. निलेश ओक यांच्या प्रस्तावनेचं कोंदण लाभलेलं आणि विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभाग पुणे यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक आतापर्यंत आपल्याला माहीत ...

आंतरराष्ट्रीय महिला दिवस...आतापर्यंतचा इतिहास आणि भारताची भूमिका!

  महिला दिन म्हणजे शुभेच्छांचा वर्षाव, ऑफिस आणि संस्थांमध्ये कार्यक्रम, कर्तृत्त्ववती महिलांचं स्मरण आणि सत्कार...अशा अनेक गोष्टी आपण सातत्याने बघत आहोत. सुरूवातीला हे “आपलं” नव्हे “बाहेरचं” फॅड आहे...असेही वादाचे मुद्दे कानावर यायचे. पण या सगळ्या वादांना मागे सारत वैश्विक पातळीवर साजर् ‍ या होणार् ‍ या या दिवसाने समस्त स्त्री वर्गात उत्साह संचारतो हे नक्की! काही मैत्रिणींच्या जाणिवा आकार घेत आहेत...पण काहींच्या दृष्टीने मात्र ही स्त्री म्हणून “स्व” च्या जाणिवेची सुरुवात ठरू शकते! मला वाटतं ही जाणीव म्हणजेच “महिला दिन!” मागे वळून पाहिलं तर आज साजर् ‍ या होत असलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात...ही मुळात एक जाणीवच होती...ज्याचा पुढे लढा झाला! महिला दिनाचा इतिहास: विसावं शतक सुरू झालं आणि लोकसंख्येबरोबरच कारखाने, व्यापार सगळं मोठ्या प्रमाणात विस्तारत गेलं. औद्योगिकरणाबरोबरच व्यक्तीचे अधिकार जास्त ठळक झाले आणि त्याबरोबरच त्यांच्यातली आर्थिक विषमता, वाद हेही वाढल्याने आर्थिक मुद्द्यांवर आधारित वेगवेगळ्या विचारसरणीही अस्तित्त्वात आल्या, झपाट्याने विकसित झाल्या. त्यावेळी...