वयम मासिक - राणी अबाक्का महादेवी - शौर्यकथा
बालमित्रांनो, भारताच्या इतिहासातली ही गोष्ट आहे सोळाव्या शतकातली! त्यावेळी आजच्या कर्नाटकातला अखंड दक्षिण कन्नड जिल्ह्याला व्यापणारा आणि त्याच्या सभोवतीचा प्रदेश ‘तुलूनाडू’ या नावानं प्रसिद्ध होता. तुलू भाषा बोलणार्या शूर आणि साहसी लोकांचा हा समृद्ध प्रदेश विजयनगर साम्राज्यात अंतर्भूत होता. इथे मुबलक प्रमाणात होणारे मसाले , कपडा , तांदूळ , औषधी अशा विविध गोष्टींना युरोप आणि इतर अनेक देशांमधे प्रचंड मागणी होती. भारताच्या समुद्र किनारपट्टीवर आंतरराष्ट्रीय व्यापाराची अनेक केंद्रं होती. यापैकीच एक म्हणजे मंगळुरूजवळ असलेलं उल्लाल हे छोटं बंदर! नेत्रावती आणि गुरुपूरा नद्यांच्या संगमावर वसलेलं हे बंदर लढाईच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वपूर्ण होतं! अशा या उल्लालमधली राणी अबाक्का महादेवी म्हणजे चौटा राजवंशातली शूर वीरांगना! या राणीने व्यापाराच्या आडून सत्ता काबिज करणार्या पोर्तुगिजांना ओळखलं आणि त्यांच्याबरोबर चिवटपणे लढा दिला. पोर्तुगिजांचा भारतात प्रवेश १४९८ साली पोर्तुगालचा वास्को-द-गामा समुद्री मार्गाने भारतात शिरला आणि भारतीय इतिहासा...