Posts

Showing posts from October, 2020

भारताच्या दुर्गा : ९. राणी अवंतीबाई: १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामातली तळपती तलवार!

  ब्रिटिशांविरुद्धचा उठाव स्वातंत्र्य संग्रामात रूपांतरित   झाला आणि बघता बघता हा वणवा भारतभर पसरला! आजूबाजूची अनेक   राज्यं खालसा केली जात असतांना ब्रिटिशांच्या मोठ्या   सैन्याबळासमोर , आधुनिक शस्त्रांसमोर गुडघे न टेकवता    आपल्या अफाट धैर्याने शेवटच्या श्वासापर्यंत झुंजणारे हे स्वातंत्र्यवीर कोणत्या मातीचे बनलेले होते ? अशीच वज्रनिश्चयी आणि धैर्याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रामगढची राणी अवंतीबाई...जिने पहिल्या लढाईमधे   ४००० सैन्यासह चढाई करून ब्रिटीशांना पराभव चाखवून परत पाठवलं. आणि दुसर्‍या युद्धांत ब्रिटीशांच्या हाती सापडण्यापेक्षा   जिवाची बाजी लाऊन...अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी   क्रांतीची ही ज्वाला अमर झाली!    स्वातंत्र्याची ऊर्मी तिच्या रगांरगांत    वहात होती!           २६ एप्रिल १८३१ ला   मध्यप्रदेशच्या मनकेहणीमधे राणी   अवंतीबाईचा जन्म झाला. लोधी समाजाचे   जमीनदार जुझार   सिंह तिचे वडील होते. लहानपणापासून अतिशय धाडसी असलेली   अवंती बाई निर्भीडपणे स...

भारताच्या दुर्गा : ८. कित्तूरची राणी चेन्नम्मा : ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र-यज्ञांतली पहिली ऊर्ध्वगामी ज्वाळा....!

  कर्नाटकमधे चेन्नम्मा नावाच्या दोन राण्या होऊन गेल्या- एक केलदीची चेन्नम्मा , जी १६९६ पर्यंत मुघलांशी लढली आणि तिच्यानंतरची दुसरी   कित्तूरची चेन्नम्मा(१७७८-१८२९).      भारताच्या संसद भवनाच्या प्रांगणात ११ सप्टेंबर २००७ रोजी एका भव्य   अश्वारूढ पुतळ्याचं राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यांत आलं! ती म्हणजे   इंग्रजांना ललकारणारी पहिली स्वातंत्र्य सेनानी   कित्तूरची   शूर वीरांगना राणी चेन्नम्मा!   तिचं इतिहासातलं स्थान अमर आहे! १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याच्या किती तरी वर्षं आधी इंग्रजांचा विस्तारवाद ओळखून त्यांच्या प्रत्येक जाचक धोरणाला कडा विरोध करत राणी चेन्नम्माची तलवार तळपत राहिली. प्रजेची आई होऊन राज्यांचं प्रशासन करणारी राणी चेन्नम्मा स्फूर्ती होऊन सैनिकांच्या सळसळत्या धमण्यांमधला लढणारा   अंगार झाली!१८२४च्या युद्धांत बलाढ्य इंग्रजांना पराभूत करत तिने धैर्याचा कळस गाठला आणि मोठाच   इतिहास रचला! आणि त्यानंतर तिच्या बलिदानाने इंग्रजांविरुद्धचा स्वातंत्र्य लढा संपूर्ण भारतात     खर्‍या अर्थान...

भारताच्या दुर्गा : ७. माता भाग कौर(माई भागो): मुघलांचा काळ होऊन बरसणारी तेजस्वी उल्का!

अन्यायाविरुद्ध , अत्याचाराविरुद्ध जी जी लढते...ती दुर्गा! खलांच्या संहारणासाठी   संतांनी देखील हातात शस्त्र घेऊन लढल्याची   उदाहरणं आपल्या इतिहासात आहेत!आपल्या समोर   बलिदानांची मालिका उभी करणारा शिखांचा इतिहास तर याला मुळीच अपवाद नाही. औरंगजेबाच्या भितीने तलवार टाकून पळ काढणार्‍या   निराश , भयभीत शिखांमधे आपल्या शब्दांनी पुन्हा एकदा लढण्याची स्फूर्ती जागी करणारी आणि   नेतृत्त्वं करत त्यांच्या सहाय्याने मुघलांवर   तुटून पडणारी   संतश्रेष्ठ   वीरांगना म्हणजे माता भाग कौर (माई भागो)!   माई भागो गुरु   गोविंद सिंहांच्या   शिष्या   होऊन त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आयुष्यभर चालल्या   आणि   वेळ आली   की आततायी शत्रूंसमोर   हातात तलवार उचलून स्वाभिमानाने लढल्या!इतरांना सुद्धा लढायला भाग पाडलं.   १७०५ साली मुघल आणि शिखांमद्धे   मुक्तसरचं   जे ऐतिहासिक युद्धं झालं त्यात   काही मोजक्या शिख सैंनिकांसह १० , ००० मुघल सैन्यावर हल्ला करणार्‍या या   वाघिणीचं धैर्य   अतुलनीय आहे! डोक्यावर ...

भारताच्या दुर्गा : ६.राणी अबाक्का महादेवी: पोर्तुगिजांना कडाडून विरोध करणारी दक्षिणेतली तेजस्वी अग्निशिखा!

भारतीय नौदलात Inshore Patrol Vessels (IPV) ची एक नौका २० जानेवारी २०१२ रोजी विशाखापट्टणम बंदरात दाखल (कामिशन) झाली...नाव होतं ICGS राणी अबाक्का! (Indian Coast Guard Ship). इतिहासाच्या पानांत लपलेल्या अबाक्का राणीच्या सन्मानार्थ   भारतीय नौसेनेने घेतलेलं   हे पाऊल अतिशय कौतुकास्पद आहे! कोण होती राणी अबाक्का ?     सातव्या शतकापासून भारताच्या दक्षिण किंनारपट्टीवरून मसाले , कपडा , लढाऊ घोडे असा अरेबियन देशांबरोबर निर्यातीचा व्यापार होत असे ज्यामुळे   हा दक्षिण किनारपट्टीचा प्रदेश खूपच संपन्न होता ! या नफ्याच्या व्यापारावर अनेक युरोपियन शक्ती डोळा ठेऊन तिथे शिरकाव करण्यासाठी प्रयत्नशील होत्या. अखेर पोर्तुगिजांनी प्रवेश केलाच! पण त्यांच्या मनमानीला , जाचक अटींना , धमक्यांना न जुमानता एक प्रचंड बळकट अशी अभेद्य शक्ती पोर्तुगिज आणि भारत यांच्यामधे उभी राहिली ती म्हणजे तेजस्वी राणी अबाक्का!तिचे अग्निबाण अनेक लढाऊ जहाजांचा वेध घेऊन त्यांना भस्मसात   करायचे! भीती हा शब्द जिच्या शब्दकोशांतच नव्हता ती राणी अबाक्का! या   निर्भीडपणामुळे राणीला “अभया राणी” ...

भारताच्या दुर्गा : ५. राणी दुर्गावती: अकबराला टक्कर देणारी साक्षात महिषासुरमर्दिनी!

  मुघलांच्या वाढत्या प्रभावामुळे स्वतःचं राज्य टिकवण्याचा विचार अनेक राजांसाठी कल्पनातीत होता...!अकबराच्या वाढत्या महत्वाकांक्षेमुळे   स्वाभिमानाने जगणं हा सगळ्यांत   मोठा   अपराध झाला होता...!त्यावेळी   अशा   आततायी शासनापुढे न झुकता , जगायचं तर   मानाने अथवा जगायचंच नाही आशा   हट्टाने पेटलेली... स्वत:हाच्या बलिदानाने “स्वाभिमानाशी तडजोड नाही” हा कडक संदेश संपूर्ण भारतवर्षाला देणारी दुर्गा म्हणजे गोंड राणी दुर्गावती! अंगात चिलखत , डोक्यावर शिरस्त्राण , पाठीला बाणांचा भाता , खांद्यावर धनुष्य ...! घोड्याच्या   दोन्ही बाजूंनी एकेक पाय टाकून उभं राहायचं आणि   तोंडात लगाम पकडून दोन्ही हातांनी तूफान तलवारबाजी करत शत्रूच्या गोटात निर्भीडपणे शिरायचं...ही होती वीरांगना   राणी दुर्गावती!तिच्या अतुलनीय   शौर्यामुळे   तसंच प्रजेच्या सर्वतोपरी केलेल्या कल्याणामुळे आजही अनेक गीतांमधून , काव्यांमधून   जी आठवली जाते ती प्रजेची आई म्हणजे राणी दुर्गावती !    ५ ऑक्टोबर १५२४ रोजी हमीरपूर(उत्तर प्रदेश)   जिल्ह्याच्य...